खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात थोर वैज्ञानिक आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय रसायनशास्त्र दिन मोठ्या उत्साहात व शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. जयेश गुजराथी (माजी उपप्राचार्य, IQAC समन्वयक व माजी विभागप्रमुख) यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी विचार मांडले. त्यांनी आचार्य रे यांच्या वैज्ञानिक कार्यावर, संशोधन व सामाजिक योगदानावर प्रकाश टाकला.
“रसायनशास्त्र हे केवळ सूत्रांचे संकलन नसून समाज घडवणारी एक सशक्त भाषा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. निलेश पवार (विभागप्रमुख, रसायनशास्त्र) होते. डॉ. अमोल मानके यांनी प्रास्ताविक करताना आचार्य रे यांचा जीवनपट दृकश्राव्य माध्यमातून सादर केला, जो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागातील डॉ. मिलिंद ठाकरे, डॉ. रवी बाळस्कर, डॉ. विवेक बडगुजर, प्रा. रामदास सुरळकर, प्रा. हर्षल सराफ, प्रा. सौ. मनीषा मोरे, प्रा. सौ. वैशाली राठोड, प्रा. सौ. प्रियांका पाटील, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री. विवेक तेले, श्री. कुंदन निकम, श्री. दीपक बाविस्कर, श्री. सुधाकर कोळी, श्री. प्रकाश डंबेलकर, श्री. सुनील बैसाणे व श्री. जगदीश शिंगाणे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. अमोल मानके यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष दीपके यांनी केले.
या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य डॉ. अरुण जैन व चिटणीस प्रा. पराग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच खान्देश शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.