दहिवडी -प्रतिनिधी :जोतिराम काटकर
आज दिनांक 25 /5 /2025 रोजी मार्डी परिसरात पाऊसाची जोरदार बँटिंग
बागवस्ती नजीक नवीन बंधारा निर्माण करण्यात आला आहे परंतु बंधाऱ्याच्या बाजूला भर टाकत असताना पाऊस सुरू झाला , तो पाऊस गेले चार – पाच दिवस संततधार बरसत राहिला. परिणामी आज 25 तारखेला पाऊसाने सकाळ पासून हजेरी लावल्याने मार्डी परिसरातील खटकाळी तलाव पासून सर्व बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत .
परंतु बागवस्ती नजीकच्या बंधाऱ्याच्या एक भाग भर टाकण्याचे पाऊसामुळे थांबले होते परिणामी त्याठिकाणी भर न भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातून पाणी वाहुन गेले . त्याबरोबरच शेतातील माती ही वाहून गेली यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तरी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर भराव टाकावा , त्याचबरोबर खचलेल्या भागातील वाहून गेलेली माती आम्हाला भरून द्यावी अशी शेतकरी आर्त विनवणी करत आहेत.