• About Us
  • Contact Us
  • Join us
Sunday, June 8, 2025
  • Login
janadharnews.com
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
No Result
View All Result
janadharnews.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop

सातारा येथे 99 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

Janadhar News by Janadhar News
June 8, 2025
in ताज्या घडामोडी
0
सातारा येथे 99 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
0
SHARES
2
VIEWS

( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
तब्बल 32 वर्षांनी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे होत आहे. पुण्याच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सांगली सातारा कोल्हापूर, पुणे येथील साहित्यिकात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे .1878 मध्ये लोकहित वादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर रघुनाथ पांडुकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते

यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल 32 वर्षांनंतर साताऱ्यात भरणार आहे. आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी एक स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीने 5 ते 7 जून रोजी निमंत्रक स्थळांना भेट दिल्यानंतर आज झालेल्या  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केल्याची माहिती अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाहक सुनिता राजे पवार,कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह सर्व घटक समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 99 व्या संमेलनाला आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला मिळणार आहे .


अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी यंदा 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार असल्याचे सांगितले.ते म्हणाले, “साताऱ्याला 32 वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळालाय .यापूर्वी 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते . गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती . “
साताऱ्यात होणारे हे चौथे साहित्य संमेलन आहे .1878 मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर 3 मे 1905 साली रघुनाथ पांडुकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झाले होते . 1962 मध्ये नवी गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली 44 वे तर 1993 साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली 66 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्या आता झाले होते .


नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा की 1993 साली 66वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम 14 एकरात असून तिथे मुख्य मंडप, 2 इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी 3 सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियममध्ये 25,000 प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे. स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलिस परेड ग्राउंडची 8 एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे. या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती गठीत करण्यात आली असून त्यात प्रा मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे.

Tags: Pradip Joshi
Previous Post

राज्यातील 17 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा

Next Post

वारकऱ्यांना ओढ आषाढी वारीची

Related Posts

मनोमिलनाच्या राजकारणास सुरवात
ताज्या घडामोडी

मनोमिलनाच्या राजकारणास सुरवात

June 8, 2025
वारकऱ्यांना ओढ आषाढी वारीची
ताज्या घडामोडी

वारकऱ्यांना ओढ आषाढी वारीची

June 8, 2025
राज्यातील 17 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा
ताज्या घडामोडी

राज्यातील 17 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा

June 8, 2025
श्याम म्हात्रे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमाचे पनवेल मध्ये आयोजन
ताज्या घडामोडी

श्याम म्हात्रे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त अनेक सामाजिक कार्यक्रमाचे पनवेल मध्ये आयोजन

June 8, 2025
पालिका सत्तेसाठी समीकरणे बदलण्यास सुरवात
ताज्या घडामोडी

पालिका सत्तेसाठी समीकरणे बदलण्यास सुरवात

June 8, 2025
मामा भाच्यानी केला बाणूरगड परिसर स्वच्छ
ताज्या घडामोडी

मामा भाच्यानी केला बाणूरगड परिसर स्वच्छ

June 8, 2025
Next Post
वारकऱ्यांना ओढ आषाढी वारीची

वारकऱ्यांना ओढ आषाढी वारीची

सर्वाधिक पसंतीच्या

  • नागापूर कॅम्प आरोग्य केंद्र बंद; डॉक्टर अनुपस्थितीवर कारवाईची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मार्डी परिसरात मुसळधार पावसामुळे बंधारे तुडुंब, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नागापूरमध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती उत्साहात साजरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खडकी गावात मुसळधार पावसामुळे तीन घरे जमीनदोस्त; मदतीची मागणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या घडामोडी

मनोमिलनाच्या राजकारणास सुरवात

मनोमिलनाच्या राजकारणास सुरवात

June 8, 2025
वारकऱ्यांना ओढ आषाढी वारीची

वारकऱ्यांना ओढ आषाढी वारीची

June 8, 2025
सातारा येथे 99 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

सातारा येथे 99 वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

June 8, 2025
janadharnews.com

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Navigate Site

  • Join us
  • Contact Us
  • About Us
  • Policies

Follow Us

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • महाराष्ट्र
  • Shop
  • Login
  • Cart

© 2025 janadharnews - Technical Support By DK Technos.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

WhatsApp Group