(प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
विटे परिसरातील वारकऱ्यांना आता आषाढी वारी सोहळ्याची ओढ लागली आहे. त्यांना वारी सोहळ्यात सहभागी होण्याचे वेध लागले आहेत. गाव पातळीवर त्याची तयारी पूर्ण झाली आहे. तालुका स्तरावर नियोजनाच्या बैठका होत आहेत. खानापूर तालुक्यातून देहू आळंदी येथे वारीत सहभागी होण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणावर जात असतात. दिंडी प्रमुख दिंड्याचे सर्व नियोजन करत असतात. खानापूर तालुका वारकरी संघटने मार्फत प्रतिवर्षी माहुली, वलखड, वेजेगाव, देवीखिंडी, घानवड, धामणी परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. वारकरी संख्या ऐनवेळी वाढली की सारे नियोजन कोलमडत असते. त्यामुळे वारीचे अगदी काटेखोरपणे नियोजन करावे लागते. दिलेल्या कालावधीत नाव नोंदणी केलेल्या वारकऱ्यांनाच सहभागी होता येते. यावर्षी 19 जूनला वारकरी आळंदीकडे प्रस्थान करणार आहेत. हा पायी दिंडी सोहळा असतो. एका वाहनात स्वयंपाक साहित्य एका वाहनात अन्य साहित्य असते. येथून आळंदीकडे वाहनाने सर्व वारकरी जातात. तेथे पायी दिंडीत सहभागी होतात. यंदा महिलांची संख्या जास्त असल्याने वारीत मुक्कामाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. गट वर्षीची मुक्कामाची ठिकाणे तीच आहेत फक्त लोणंदचे मुक्काम ठिकाण बदलण्यात आले आहे. त्याची पूर्व पाहणी देखील झाली आहे. वारकऱ्यांनी उपयोगी वस्तू साहित्य औषधे आपल्या बरोबर घ्यावीत. असे संयोजकानी आवाहन केले आहे. बैठकीत सर्व त्या सूचना करण्यात आल्या आहेत.