दहिवडी – प्रतिनिधी : संग्राम तुपे
खडकी गावठाण येथे सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आण्णा श्रीरंग तुपे, विष्णू श्रीरंग तुपे व आनंद विठ्ठल साळुंखे यांची घरे कोसळली आहेत. पावसामुळे या कुटुंबांवर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेषतः आनंद विठ्ठल साळुंखे हे गेल्या दोन वर्षांपासून पंतप्रधान आवास योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक वेळा अर्ज करूनही अद्याप त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. सध्या घर पडल्याने त्यांच्यावर राहण्याची अडचण निर्माण झाली आहे.
स्थानिक प्रशासनाने तात्काळ पंचनामा करावा, तातडीने मदत पोहोचवावी व संबंधितांना घरकुल योजनेचा लाभ त्वरित मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
