( प्रदीप जोशी, विटे पत्रकार )
अजून नगरपालिका निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत. त्या पूर्वीच हवसे नवसे गवसे यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. एका बाजूला पावसाची रिमझिम तर दुसऱ्या बाजूला निवडणुकीचे आराखडे बांधले जात आहेत. यंदा इच्छुकांची यादी बरीच मोठी आहे. तीन आघाड्यांचे संकेत दिले जात आहे. पूर्वा श्रमिचे मोजकेच चेहेरे दिसणार आहेत. अजून राजकारणाला गती यायची आहे. चौकातील कट्टा रात्री उशीरा पर्यंत जागा असतो. त्याचा एक फायदा म्हणजे लोकांचे संरक्षण होते. कट्ट्यावरील चर्चेला तसा फारसा अर्थ नसतो. ज्येष्ठ नेते युवा नेते अद्याप शांत आहे. लोकांनी मतदान करताना आपल्या प्रभागाचे किती प्रश्न सुटले याचा आवर्जून विचार करावा. राजकारणात सगळी सरमिसळ असल्याने प्रत्येकजण एकमेकाकडे साशंकतेच्या नजरेने पहात आहे. अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी जुळवा जुळव सुरु आहे. किती आघाड्या असणार त्यांचे नेतृत्व कोण करणार हाही चर्चेचा. मुद्दा आहे. प्रभाग संख्या अद्याप निश्चित नाही. काही माजी नगरसेवकानी कामाचे सातत्य ठेवले आहे. काहींनी प्रभागाच्या विकासाकडे पाठ फिरवली आहे.
काहीजण नेत्या सोबत आपले फोटो प्रसिद्ध करत आहेत. त्यातच विटे शहराची काँग्रेसची कार्यकारिणी फेर रचना करण्याची मागणी आहे. शहरात स्वाभिमानी पेक्षा लाचारांची फौंज मोठी आहे. शहरात अतिक्रमणे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याच्या वरद हस्ताची चर्चा आहे. दीर्घकाळ प्रशासकीय राजवट असल्याने लोकांची कामे पडून आहेत. वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही. विट्याच्या राजकारबाबत ठोस काहीही सांगता येत नाही. कारण म्हणतात ना सकाळी विटे दुपारी उपराटे.