( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
शिवराज्याभिषेक दिन मराठी माणसाच्या अभिमानाचा दिवस. दरवर्षी तो विविध पद्धतीने साजरा केला जातो. यावर्षी इस्लामपूर येथील काही मावळ्यांनी या दिवसाला वेगळ्याच पद्धतीने उजाळा दिला. बाणूरगड कुशीत असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या समाधी स्थळाची स्वच्छता करण्याचा संकल्प त्यांनी केला. अमरनाथ मंगसुळे (येळावी ), त्यांचे दोन भाचे समर्थ बंडगर ( इस्लामपूर ), व शोर्य हराळे ( वांगी ) यांनी या दिनाचे औचित्य साधून परिसराची स्वच्छता केली. गडावरील पालापाचोळा, प्लास्टिक पिशव्या, बिसलरी बाटल्या एकत्र करून स्वच्छता अभियान राबवले. आगळ्या वेगळ्या कृतीने त्यानी गडाला केलेले अभिवादन सर्वाना स्फूर्तीदायक असेच होते. समाधीला केवळ स्वच्छतेच्या माध्यमातून फुलांनी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून केलेले हे अभिवादन चर्चेचा विषय ठरले होते. मामा भाच्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.